
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा सातपुडा पर्वतरांगेतील वाढते अतिक्रमण आणि वृक्षतोड थांबवून स्थानिक आदिवासींचे जीवन व पर्यावरण वाचवावे, अशी मागणी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेने वन विभागाकडे केली आहे.
संघटनेचे संचालक,प्रदेश सरचिटणीस मन्सूर एस.तडवी यासंदर्भात निवेदन देणार आहेत.
ते म्हणाले, “सातपुडा पर्वत हा केवळ डोंगर नाही तर आदिवासींची जीवनरेखा आहे. कधी सातपुडा हा हिरवागार झाडे झुडपांनी भरलेला असायचा पण काही भाग हे विराण झालेले दिसत आहे येथे जर मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाली तर तापमानात प्रचंड वाढ होईल आणि त्यामुळे दुष्काळाला थेट आमंत्रण मिळेल. झाडांमुळेच आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरते मुळे नागरिकांचे काय हाल झाले हे आपण विसरू शकत नाही.”
तडवी यांनी पुढे आरोप केला की, “काही परप्रांतीय लोक जंगलातील जमिनीवर अतिक्रमण करत आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी फक्त वन मजूर आणि वनरक्षक यांच्यावर अवलंबून न राहता गस्ती पथक वाढवावे नाहीतर सातपुडा पर्वत हळूहळू नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. हे होऊ देणे पर्यावरण आणि पुढच्या पिढ्यांसाठी घातक ठरेल.”
संघटनेच्या काय आहेत मुख्य मागण्या:
- सातपुडा पर्वतरांग परिसरातील अवैध जंगलतोड आणि अतिक्रमण तातडीने थांबवावे.
- स्थानिक आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना वन हक्क कायद्यानुसार न्याय द्यावा.
- वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबवून हरित पट्टा वाढवावा.
- ज्या ठिकाणी जंगल तोड झाली त्या ठिकाणी एस आर पी कॅम्प उभारावे.
संघटनेने वन विभागाला तातडीने कारवाई करून सातपुडा पर्वत वाचवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला







