
उप संपादक मन्सूर तडवी
रावेर दिनांक 31/7/26 रावेर तालुक्यातील सातपुडा डोंगररांगेतील गुल्ली लोहारा ते कुसुंबा दरम्यान वाहणाऱ्या सुकी नदीला पावसाळ्यात पूर आल्याने दोन्ही आदिवासी गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. या मार्गाने कुसुंबा, सहस्रलिंग लालमाती, पाल, मोर्व्हाल मार्गे थेट हा रस्ता मध्य प्रदेशलाही जाता येते. मात्र गेल्या 6 ते 7 वर्षांपासून गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर आणि लोकप्रतिनिधींकडे पुलाची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
पावसाळ्यात हा रस्ता तब्बल दीड ते दोन महिने बंद राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील माल तसेच केळी वाहतूक करण्यास रस्त्या अभावी ठप्प होते. रावेर हे तालुक्याचे ठिकाण असून या मार्गाने एसटी बस सेवा पुरा मुळे बंद करण्यात येते या मार्गाने शाळकरी विद्यार्थी कॉलेज साठी अप डाऊन करणाऱ्यांना पण खूपच त्रास सहन करावा लागतो आणि एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी दुसऱ्या लांबच्या मार्गाने न्यावे लागते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार केवळ गुल्ली लोहारा आणि कुसुंबाच नव्हे तर या एका पुलामुळे जवळपास 10 ते 11 गावांचा संपर्क तुटतो सातपुड्यातील या आदिवासी भागाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
आता या वर्षी तरी सुकी नदीवर तातडीने पूल मंजूर करून बांधण्यात यावा, अशी ठाम मागणी गुल्ली लोहारा आणि कुसुंबा येथील ग्रामस्थ यांनी केली आहे काय आहेत गावकऱ्यांच्या अडचणी:
- आरोग्य: रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेता येत नाही
- शिक्षण: मुलांची शाळा-कॉलेजची वाहतूक बंद
- शेती: शेतमाल बाजारापर्यंत पोहोचत नाही
- वाहतूक: रावेरसाठी एसटी बस सेवा पूर्णपणे बंद







