
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा : चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील मोहरद येथील चांदण्या तलाव परिसरात वनविभागा मार्फत जंगलातील चालू वर्षी वन्यप्राण्यांसाठी पाणी आडवण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इस्टिमेटनुसार काम न करता हे काम घाईघाईत उरकल्याने पहिल्याच पावसात बंधाऱ्याच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत.
माहितीनुसार, जे काम जेसीबीच्या साह्याने 8 ते 10 दिवसात पूर्ण व्हायला हवे होते ते अवघ्या 4 दिवसात उरकून टाकण्यात आले. यामुळे बांधकामाचा दर्जा अत्यंत खालावला आहे.
चांदण्या तलावाजवळून जाणारा साईझिरा नाला हा बारमाही वाहणारा जिवंत नाला आहे. या ठिकाणी जर 12 महिने पाणी साठवणारा बंधाराचे काम चांगले झाले असते तर उन्हाळ्यात जंगलातील प्राणी, पक्ष्यांची तहान भागली असती. मात्र सध्याच्या परिस्थितीत बंधारा पहिल्याच पुरात कमकुवत झाल्याने फूटण्याच्या मार्गावर आहे वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच चांदण्या तलाव व परिसरातील ग्रामस्थांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे सरचिटणीस तथा पत्रकार उपसंपादक मन्सूर एस. तडवी यांच्याशी संपर्क साधून पाहणी करण्याची विनंती केली. पाहणी दरम्यान बांधकामाच्या खालची भिंती ला भेगा पडलेल्या असून भिंतींना कुठेच पिचिंग करून आढळून आली नाही आणि मेन भिंतिची उंची खूपच कमी असल्याने भेगामुळे बंधारा फुटण्याच्या मार्गावर आहे जर बंधारा फुटला तर त्याच्याखाली मोठे पाझर तलाव आहे त्या बंधारातील पाण्याच्या प्रवाहमुळे खालचे पाझर तलाव पण फुटू शकतो आणि त्याच्या खालीलच वस्ती आहे या कामा मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत
याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वनविभागाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शासकीय निधीचा अपव्यय झाला असून जंगल संवर्धनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
उप संपादक मन्सूर तडवी,







